नेमकं घडलं काय ?
एसटी विलीनीकरणाच्या मुद्यावरून अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारीवर्ग ठाम असल्याने अखेरीस हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. दरम्यान कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली आणि या मुद्यावर सविस्तर चर्चा केली आणि अखेर संघटनेकडून संप मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
दरम्यानच्या काळातील अनेक घडामोडीनंतर या महत्त्वपूर्ण घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनेसाठी दिलासा मिळाला असल्याची भावना व्यक्त होत आहे, मात्र काही कामगार संघटनांनी या निर्णयाला सपशेल विरोध दर्शवत आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे.